गावगाथा

विद्यार्थ्यांनी चुकीचे सल्ले घेऊन भरकटण्यापेक्षा आपल्या आवडीचे करिअर निवडल्यास निश्चित आपले ध्येय गाठता येईल असे अँड. शरद फुटाणे

शैक्षणिक मार्गदर्शन

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*विद्यार्थ्यांनी चुकीचे सल्ले घेऊन भरकटण्यापेक्षा आपल्या आवडीचे करिअर निवडल्यास निश्चित आपले ध्येय गाठता येईल असे अँड. शरद फुटाणे यांनी व्यक्त केले.*

ते अक्कलकोट येथील राजेराय मठ, बेला फाउंडेशन व युवा गवळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४ या सालातील दहावी व बारावी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. या आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून अँड. शरद फुटाणे हे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अँड. अनिल मंगरुळे सेवानिवृत्त प्रा.किसन झिपरे, खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराया आडवीतोटे, बेला फाउंडेशनचे अध्यक्ष श्रद्धांक झिपरे, अँड. विकास जाधव, विकास दोडके, गवळी समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांतअप्पा झिपरे आदिजन उपस्थित होते. याप्रसंगी अँड. अनिल मंगरुळे, श्रद्धांक झिपरे, प्राचार्य शिवराया आडवीतोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी चंद्रकांत भागानगरे, भीमाशंकर भास्कर, दीपक शहापूरकर, राम भास्कर, अनिल गवळी, संतोष पंगुडवाले, नमित झिपरे, भारत पंगुडवाले, संदीप झिपरे, गिरीश पगुडवाले, स्वामीनाथ शहापूरकर, प्रकाश तालपिटे, राजकुमार हूचे, कृष्णात तीरकप्पा, सोनबा पैलवान आदीसह समस्त गवळी समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भीमाशंकर भास्कर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीकांत झिपरे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button