
धरिञी विघालय संस्काररुपी विघापीठ असून आदर्श शाळा – भीमराव मोरे
नळदुर्ग ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला . याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा तर अतिथी स्थानी महादेवप्पा नरे गुरुजी,श्रीहरी जाधव,संगीत शहा उपस्थित होत्या. ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, उपाध्यक्ष भीमराव मोरे, सचिव एडवोकेट सयाजी शिंदे,कोषाध्यक्ष मल्लिनाथ माळगे,सहसचिव वसंतराव रामदासी, सदस्य किरण पाटील,सदस्या नीताताई पाटील उपस्थित होत्या.तसेच अजित चव्हाण,सतीश भोसले,क्षीरसागर नेताजी,कमलाकर चव्हाण,दीपक शिंदे,आपले घरचे व्यवस्थापक विलास वकील उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन कुंडीतील रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते झाले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी या भारतवासी सारे या स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले.सर्व मान्यवरांचा सत्कार शाल,पुस्तक व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी केले. प्रास्ताविकेत त्यांनी दहावीचा निकाल,विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढवण्यासाठी शाळेचे प्रयत्न,पालकांची भूमिका, विद्यार्थ्यांचे सहकार्य या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, शाल, प्रशस्तीपत्रक, रोख रक्कम देऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.यामध्ये इयत्ता दहावी मधील सुदर्शन घोडके, तन्वी पवार, सक्षम पाटील, माधुरी बिराजदार ,संस्कृती दळवे,प्रेरणा कांबळे,पंकज कदम, नम्रता कोकणे, मयुरी घोडके, दीक्षा लोंढे, रेहान शेख,सोहेल सुतार यांचा गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी सुरज कांबळे याने स्वखर्चाने दहावी मधील प्रथम तीन क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व रजिस्टर,गुलाब पुष्प देऊन गौरव केला. शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षामध्ये ए ग्रेड मिळवलेल्या संस्कृती कदम, अनिरुद्ध मोरे, ज्ञानेश्वर माळी या विद्यार्थ्यांचाही गोल्ड, सिल्वर व ब्रांझ मेडल, सर्टिफिकेट व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.शाळेच्या मुख्याध्यापकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांची गवळी व सुरज कांबळे हे माजी विद्यार्थी विना मोबदला शाळेत मुलांना गणित व विज्ञान या विषयांचे मार्गदर्शन करत आहेत. यासाठी त्यांचाही सत्कार शाल, पुस्तक, गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी आत्तापर्यंत ७९ वेळा रक्तदान केले होते. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेदिवशी त्यांनी ८० वे रक्तदान पुण्यामध्ये केले. त्यांच्या या कार्याची माहिती सर्वांना कळावी व इतरांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या हस्ते त्यांचाही सत्कार शाल,पुस्तक,गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यानंतर धरित्री प्राथमिक विद्यामंदिर मधील पहिली ते चौथी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम तीन क्रमांक घेतलेल्या चिमुकल्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते गोल्ड,सिल्वर व ब्रांझ मेडल,सर्टिफिकेट व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. तसेच धरित्री विद्यालयातील पाचवी ते नववी मध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम तीन क्रमांक घेतलेले विद्यार्थी व मागासवर्गीय प्रथम तीन क्रमांक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र, गोल्ड, सिल्वर,ब्रांझ मेडल व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी इयत्ता दहावीतील माधुरी बिराजदार,दीक्षा लोंढे, संस्कृती दळवे, जान्हवी भालेराव, संस्कृती कदम,ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून त्यांच्या यशाचे श्रेय आई-वडील व शाळा यांना दिले. ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे उपाध्यक्ष भीमराव मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व,बक्षीसामुळे मिळणारी ऊर्जा,पालकांचे कर्तव्य याची महती सांगितली.शाळेच्या सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापिका संगीता शहा यांनी मुलांना आयुष्यात शिस्तीचे महत्व, अभ्यास करण्याची पद्धत, मोबाईलचा योग्य वापर, महिला पालकांची भूमिका अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला. कमलाकर चव्हाण यांनी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद या स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा उल्लेख करत त्याची सांगड आजच्या विद्यार्थ्यांनी कशी घालावी हे सांगितले.खरे बोलणे, मानवतेने वागणे,शिक्षकांचा आदर,मोबाईलचा अतिवापर, आईची भूमिका अशा विविध अंगानी आपली भूमिका मांडली. शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक कोकणे माणिक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले,इतरांनी यापासून प्रेरणा घेऊन असेच यश संपादन करावे असे सांगितले व वेळोवेळी शाळेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अतिथी श्रीहरी जाधव यांनी पहिलीपासून सर्व इयत्तातील विद्यार्थ्यांच्या सत्कारा बद्दल आनंद व्यक्त केला. आत्तापासूनच बक्षीसापासून मिळणारी ऊर्जा त्यांना भविष्यात उत्तम यशापर्यंत पोहोचवेल असा विश्वास निर्माण केला. गुणवत्तेबरोबर माणुसकीची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.महादेवप्पा नरे गुरुजी यांनी यश आणि अपयश याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजून दिला. परीक्षेतून विकास,वक्तृत्व शैली, प्रभावी आशय घन,कलेपासून तयार होणारे सुंदर मन,भौतिक दर्जा अशा विषयांवर मार्गदर्शन केले.गांधीजी, ऑलम्पिक धावपटू रॉजर, सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटना विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकले व त्याच्या नोंदी आपल्या वहीत करून घेतल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कारंजे यांनी केले.आभार जगताप गोरख यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.
