
धरित्रीचे राज्यस्तरीय चार विद्यार्थिनींचा पुण्यामध्ये भव्य सत्कार…..
नळदुर्ग ज्ञानदीप कलोपासक मंडळ नळदुर्ग संचलित धरित्री विद्यालयातील करदुरे अयोध्या, वैष्णवी चव्हाण व ज्ञानेश्वरी पवार,संस्कृती कदम या विद्यार्थिनींनी एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय श्यामची आई पुस्तक वाचन आकलन स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. दोन्ही फेरीमध्ये उत्तीर्ण झाल्याने आज पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे निवृत्त मुख्य सचिव नितीन करीर व साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक वडघर चे अध्यक्ष प्रमोद निगोडकर यांच्या हस्ते एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या विश्वस्त सचिव साथी लोमटे व साथी प्रा.सुभाष वारे यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार झाला.सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे सत्काराचे स्वरूप होते. एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशन सभागृह नवी पेठ पुणे येथे हा समारंभ आयोजित केला होता. साने गुरुजी तसेच सामाजिक वास्तव या विषयावर झालेल्या चर्चासत्रात या विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवला.असंख्य मान्यवरांच्या, पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. ज्ञानदीप कलोपासक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव चव्हाण, सचिव एडवोकेट सयाजीराव शिंदे, सहसचिव वसंतराव रामदासी, कोषाध्यक्ष मल्लिनाथ माळगे, सदस्य किरण पाटील, दत्तात्रय जोमदे, नरसिंग माकणे, सुभाष दासकर, नीता पाटील व अर्चनाताई डुकरे यांनी या विद्यार्थिनींचे व शाळेचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या.या विद्यार्थिनींना शाळेचे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक सुनील पुजारी यांनी मार्गदर्शन केले होते. सुनील पुजारी यांच्या प्रोत्साहन व सहकार्यामुळे हा सन्मान प्राप्त झाल्याचे भावना विद्यार्थिनींनी मनोगतातून व्यक्त केली. पालकांनीही याबाबत आपला आनंद व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पुजारी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थिनींचे कौतुक केले.
