गावगाथा

शालेय नियोजन काळाची गरज आहे — सुनील पुजारी 

विशेष लेख

शालेय नियोजन काळाची गरज आहे — सुनील पुजारी 

सध्या परिस्थितीतील शाळा चालवणे पूर्वी इतके सरळ आणि सोपे राहिलेले नाही. एखादा मोठा उद्योग व्यवसाय विकसित करण्यासाठी, त्याचे दैनंदिन कामकाज उत्तम प्रकारे होत राहण्यासाठी जसे उत्तम व्यवस्थापन हवे असते, त्याचप्रमाणे शाळेच्या विकासासाठी दैनंदिन काम सुव्यवस्थितरित्या चालू राहण्यासाठी उत्तम शालेय व्यवस्थापनाची गरज असते. आता आपणास आपल्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधी म्हणजे शालेय नियोजना संबंधी विचार करावयाचा आहे, शालेय नियोजन म्हणजे जून मध्ये शाळा सुरू झाल्यावर एक दोन दिवसा कामे उरकून टाकायची गोष्ट नाही. नियोजनाचे महत्त्व एकदा मनाला पटले की, नियोजनाचा विचार एप्रिल पासूनच डोक्यात घोळायला सुरुवात होते. नियोजन नेमकं कशाकशाचे करायच? कसं कसं करायचं? कोणत्या योजना आकायच्या? यासंबंधीचे विचार मनात सुरू होतात. त्याचवेळी नियोजनाचे पूर्व संदर्भ व त्यातील विविध बारकावे आठवू लागतात. काही पूर्व अनुभव जागृत होतात. नियोजन विषयक मानसिकतेची अशी मनाची जडणघडण होत राहते. ज्या शाळेसाठी आपल्याला नियोजन करायचे असते तेथील काही रुळलेल्या परंपरेचा विचार करावा लागतो. मळलेल्या पाऊलवाटांचा परिचय करून घ्यावा लागतो. सभोवताचे वातावरण, सामाजिक स्थिती, पालकांची आर्थिक परिस्थिती, सुशिक्षित व अशिक्षित पणा, राणी माँ याविषयी नेमकी अचूक माहिती समजून घ्यावी लागते. शाळा व मुलांच्या शिक्षण याविषयी पालकांची असलेली मते व शिक्षणाविषयी आढळून येणारी आस्था अनास्था इत्यादी बाबी विचारात घ्यावयाच्या असतात. अशा अनेक बाबीचा विचार का करायच? तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, मुलांची शैक्षणिक प्रगती अधिकाधिक चांगली राहण्यासाठी, आकर्षक शैक्षणिक वातावरण, प्रसन्न शालेय परिसर, भौतिक सोई -सुविधा व शैक्षणिक साधनसामग्रीने समृद्ध वर्ग खोल्या तसेच उत्साही, कष्टाळू आणि मेहनती शिक्षक वर्ग या सर्व बाबींची अनुकूलता आवश्यक असते. केवळ पाठ्यपुस्तकाचे व अभ्यासक्रमाचे वार्षिक, मासिक, साप्ताहिक अध्यापनाचे नियोजन केले आणि शाळेची जशी स्थिती आहे त्याच स्थितीत होईल तेवढं व जमलं तसं मनमानी काम करीत राहिल्याने शाळेचा विकास व विद्यार्थ्यांची प्रगती हवी तशी अपेक्षेप्रमाणे होणे केवळ अशक्य असते. म्हणूनच शाळेच्या नियोजनासाठी शाळेसह परिसर विचारत घेऊन विचारपूर्वक नियोजन करायचे असते.
नियोजन पूर्व अनेक बाबी संबंधी मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षकाने मनमोकळेपणाने विचारविनिमय करावा, अनेक बाबीचा, कल्पनांचा ओहापोह करावा. यावर्षी त्यातून निश्चितपणे काय काय करायचे? कोणत्या योजना राबवायच्या हे प्रथम ठरवावे, यासाठी दिलेला वेळ हा सत्कारणीच लागतो.
नियोजन पूर्व बाबी निश्चित केल्या की त्या करताना अपेक्षित साध्यांचा दूरदृष्टीने विचार करावा लागतो. त्यात गरजेनुसार, परिस्थिती अनुसार आणि अनपेक्षित घटनेनुसार वेळोवेळी बदल करावे लागतात.
नियोजन करताना मुख्याध्यापकाची भूमिका महत्त्वाची असते. ती जबाबदारी त्यांनी आपले सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन पार पाडाव्याचे असते. नियोजन करून काम हाती घ्यायचे असते. हे सूत्र अंगवळणी पडले की, ती काम कमी श्रमात, कमी वेळेत, चांगल्या प्रकारे बिनबोभाट पार पडतात व संस्थेचा कारभार सुरळीत व शिस्तीने पार पाडत राहतो.
आपल्या शाळेची सध्याची स्थिती कशी आहे? शाळेच्या विविध बाबीची पार्श्वभूमी का आहे? कोणी वा कोणत्या आहे? उद्दिष्ट पूर्तीसाठी कोणत्या अडचणी किंवा समस्या सोडाव्या लागणार आहेत? भौगोलिक परिसर कसा आहे? विद्यार्थी संख्या किती आहे? इत्यादी बाबींचा व मनुष्यबळांचा सखोल विचार करून कोणते बदल आवश्यक आहेत, कोणते बदल अपेक्षित आहेत याची क्रमवार नोंद नियोजन करण्यापूर्वी घेणे गरजेचे असते. उदाहरणार्थ शाळेसाठी फर्निचर उपलब्ध करणे, गरीब, हुशार, गरजू मुलांना पुस्तके, वह्या, दप्तरे, व शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देणे, मुताऱ्या व शौचालयाची सोय करणे, त्यांच्या दैनंदिन स्वच्छतेची व्यवस्था करणे, सिमेंटचे फळे बनवून घेणे, डिजिटल बोर्ड बनवून घेणे, क्रीडा डांगण सपाटीकरण करणे, वर्ग खोल्यांची मुरुमाची जमीन असल्यास तिची खड्डे बुजून दुरुस्ती करणे किंवा फरशा बसवणे, इमारतीची रंगरंगोटी करणे, किरकोळ डागडुजी करणे, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकरिता स्वतंत्र कार्यालय व बैठक खोल्यांचे बांधकाम करणे, जास्त किमतीची शैक्षणिक दृकश्राव्य साधने खरेदी करणे, शालेय इमारत वर्ग खुल्या बोलक्या करणे अपेक्षित आहे, इतर आवश्यक असलेल्या भौतिक गरजांचा प्रथम प्राधान्यक्रम ठरवावा. अपेक्षित बदलासाठी आवश्यक असलेली आर्थिक तरतूद, माणसांचे सहकार्य, विविध साधना सामग्री ही आपण प्राप्त करू शकू की नाही याचाही विचार नियोजनापूर्वी करावा लागतो. तसेच त्या बॉबी संबंधीचे पूर्व अनुभव व माहितीचे संकलन केले तर ते फारच उपयुक्त ठरू शकते.
सर्व शिक्षकांना व संबंधितांना नियोजन करताना मुख्याध्यापकाने बरोबर घ्यावे लागते. विश्वासाने परस्पराशी विचार विनिमय करावा लागतो. नियोजन कारवाईत त्या त्या विषयांची त्या त्या बाबींची अनेक आगाऊपांगाने साधक बाधक चर्चा करणे ही गरजेचे असते. नियोजनात डोळसपणा व दूरदृष्टी ठेवावी लागते, मग त्यातूनच प्रत्यक्षात उतरू शकेल, वेळेत पूर्ण करता येईल असे नियोजन आकारास येते.
नियोजना सर्व संबंधितांना सहभागी करून घेतले की, नियोजनाची सर्व उद्दिष्टे व ठरवलेली कार्यपद्धती सर्वांना स्पष्टपणे समजून घेता येते. हे नियोजन आपणच आपणासाठी केलंय ही भावना निर्माण होते. त्यामुळे कामाचे ओझे न वाटता ती कामे आवडीने मनापासून केली जातात. अशा प्रकारे नियोजनाच्या कार्यवाहीला उत्तम सहकारी मिळते. कामाचा वेळीच आणणे म्हणून नाईलाजाने केलं पाहिजे. ही भावना त्यात नसते म्हणून ते चिडत कुढत कसेतरी केले जात नाही. मुख्याध्यापकांनी आपलेपणानेच कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून त्यांना प्रेरणा घ्यावी, पुढे मार्गदर्शन करणे, नियंत्रण करणे, निर्माण झालेले अडसर दूर करणे या कामात स्वतःला झोकून द्यावे. नियोजनानुसार कामे करण्याची सवय ज्याच्या अंगवळणी पडलेली नसते अशा व्यक्तींना नियोजनाप्रमाणे कामे करण्याबाबत आत्मविश्वास नसतो. काहींना नियोजनाचे महत्त्व मनोमन पटलेले नसते. अशा व्यक्तीकडून कळत नकळत नियोजनाची उपेक्षा होते. नियोजन म्हणजे त्यांना त्यांच्या दृष्टीने नसता व्याप किंवा कटकट वाटते. केवळ एक प्रथा म्हणून किंवा कोणीतरी हे कामे सांगितले म्हणून, अथवा कोणाला तरी ते दाखवण्याकरिता केले पाहिजे, यासाठी ते उरकून टाकलं पाहिजे अशा त्रासिक विचाराने याकडे पाहिलं जातं. मग त्यासाठी दुसऱ्यांच्या नियोजनाची नक्कल करणे अथवा तयार मिळालेले तर त्याचा वापर कमणे या मार्गाचा अवलंब त्यांच्याकडून केला जातो ‌. नियोजन म्हणजे नसते कागदी घोडे नाचवणे, प्रत्यक्षात न येणाऱ्या गोष्टींच्या नोंदी करणे, असेही समजून चालणारे काही असतात. ते नियोजनास एक फॅड म्हणून संबोधतात. अशा नकारात्मक भूमिकेतून नियोजनाकडे पाहणाऱ्या व्यक्तींना नियोजन म्हणजे नसते आवडंबर, पोकळ प्रदर्शन असंच वाटतं. अशा विचारांच्या अपवादात्मक व्यक्तींच्या मत मतांतरामुळे किंवा प्रतिकूल प्रतिक्रियेमुळे नियोजनाचे महत्त्व कधीही कमी होत नाही.
काही नवीन शिक्षक नियोजनाची पद्धती, नियोजनाची शक्ती व नियोजनाचे लाभ याबाबत कमी अनुभवी असू शकतात. नियोजनाबाबतचे अनुभव अद्याप त्यांना घ्यावयाचे असतात. नियोजनाशिवाय कोणत्याच चांगल्या कामाचे पानही हलू शकत नाही. हे जाणते शिक्षक जाणून असतात. म्हणूनच ते नियोजनाची कास धरतात ‌
शाळेतील ज्या ज्या बाबींचे नियोजन करायचे असते व जे अपेक्षित बदल घडवून आणाव्याचे असतात ते गरजेपोटी किंवा समस्या निवारण्यासाठी जे असले पाहिजेत. पण कोणाच्या लहरी कातर किंवा हाऊस म्हणून इतरांच्या अनुच्छेने पणे शिक्षकांना दबावाखाली ठेवून एखादी योजना राबवली गेली तर मात्र ती यशस्वी होण्याची शक्यता कमीच असते. शिवाय ती अल्पजीवी ठरते.
गुणवत्ता वाढीचे व विकासाचे उपक्रम राबविले, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत होतील अशा योजना राबवणे, शिक्षकाची गुणवत्ता, कामावरील निष्ठा, विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे, कोणत्याच कामाचा वेळेत पूर्ण करण्याचा आव आणून दाखवणे, त्यामुळे शाळेची प्रगती होऊ शकत नाही. शिक्षक हा ज्ञान परायण असला पाहिजे त्याशिवाय शाळेची प्रगती होणे अपेक्षित नाही. आडातच नाही तर पावर् यात कसे येणार ? कार्यक्षमता व क्रियाशीलता वाढत राहील अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतल्यास सहसा कोणाचा विरोध नसतो. मात्र अशा अनेक गोष्टीचा प्राधान्यक्रम निश्चित करून, सर्वांना विश्वासात घेऊन, या गोष्टी केल्यास अपेक्षित फलप्राप्ती होते. मनात आणले तर प्रत्येक शिक्षक चांगले नियोजन करू शकतो. परंतु प्रत्येक वेळी केलेल्या नियोजनाप्रमाणेच यश लाभेलच असे ठामपणे निश्चित सांगता येत नाही पण सुरुवातीला नियोजनात अपयश आले तरी निराश होऊ नये. जिद्दीने व आशावादी होकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून पुन्हा नव्या जोमाने नियोजन करीत पुढे पुढे जायला हवे. पक्षी घरटी बांधत असतात अवखळ मुलांनी ती मोडली अथवा वादळ वाऱ्याने फांद्या तुटून ती नाहीशी झाली तरी ते पक्षी नव्या उमेदीने अधिक गतीने नवीन घरटी बांधतातच ना! असं आठवलं तरी आपली उमेद वाढायला लागते. नियोजनाच्या अगोदरच्या यशातच उद्याच्या यशाही बीजे दळून बसलेली असतात. त्यातूनच नियोजनाची कौशल्य संपादन करता येतात. अपेशीही यशाची पहिली पायरी हा अनुभव येऊन जातो.
नियोजन करताना चुका होऊ शकतात त्यातूनच नवनव्या काही शिकायला मिळतं पुढं पुढं सरावाने यश मिळू लागलं की उमेद वाढते. मग अधिक उत्साहाने आखीव-रेखीव योजना साकारावी म्हणून नियोजनाच्या कारवाईला योग्य दिशेने व योग्य गतीने सुरुवात होते. नियोजनाचे यश दिसू लागली की, इतरांनाही त्या कामात क्रियाशील सहभाग घ्यावासा वाटतो त्याची कामे करण्याची उर्मी जागृत होऊन सहकार्यात वाढ होते. असं घडलं की, धावत्या ला शक्ती येईल आणि मार्ग सापडेल, थांबला तो संपला या प्रेरणादायी सूत्रांचा संदेश मनात घर करू लागतो. केल्याने होत आहे रे, आधी केली ची पाहिजे हा और आगे बढो चा संदेश मिळत राहतो.
आपण आपल्या नियोजनाद्वारे अंतिम ज्या गोष्टी साध्य करू इच्छितो त्याच्या नियोजनासाठी अशा अनेक अंगाने त्या नियोजनाचा विचार करावा लागतो. त्या सर्व गोष्टी पूर्व तयारीचा पायाभूत आधार असतात. त्या आधारावरच आदर्श नियोजन आकारास येथे त्यातूनच पुढे संकल्प सिद्धीसाठी त्याची वाटचाल चालू होते. हे नियोजनाचे महात्म्य जो समजून उमजून जाणून घेतो, त्यानुसार नियोजन करतो आणि ते कृतीत आणतो तो आपल्या कार्यात निश्चितच यशस्वी झाल्याखेरीज राहत नाही.
सुनील पुजारी मुख्याध्यापक महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार प्राप्त धरित्री विद्यालय आलियाबाद नळदुर्ग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button