उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी “म. गांधीजींचा वैचारिक वारसा जोपासू या —प्रा. डॉ. बिराजदार
जयंती विशेष

“उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी “म. गांधीजींचा वैचारिक वारसा जोपासू या —प्रा. डॉ. बिराजदार
सोलापूर :दिनांक 2 कर्णिक नगर येथील उत्कर्ष वाचनालयात आज सकाळी म. गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती उल्हासाने साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डाँ. भीमाशंकर बिराजदार सर हे होते. अध्यक्षस्थानी प्रा .अशोक काजळे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात म.गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली . श्री बिराजदार सर यांनी पुष्पहार अर्पण केले. उपस्थित सर्वांचे स्वागत ग्रंथपाल मिसालोलू यांनी केले. प्रस्ताविक कोषाध्यक्ष कृष्णात देवकर यांनी केले. तद्नंतर अध्यक्षांच्या हस्ते प्रा.डॉ बिराजदार सर यांचा ग्रंथभेट देवून वाचनालयातर्फे सत्कार करण्यात आला. नंतर ज्येष्ठ संचालक जाधव तुळशीदास यांनी म. गांधी व शास्त्री यांच्या विचाराचे महत्व आजही असून ते आजच्या नेत्यांनी अंमलात आणल्यास देश लवकरच प्रगती करील .स्वतंत्र्य पूर्व काळात आपल्या देशातील लोकांना दिशा दाखवणारे नेतेच नव्हते. म. गांधीनी आपल्याला सत्य व अहिंसा यांचा मार्ग दाखविला. त्यामुळेच आपला देश स्वतंत्र झाला. असे जाधव यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषण करताना श्री अशोक काजळे यांनी सांगितले की, आज संपूर्ण जगच विनाशाच्या वाटेवर ,मृत्युशय्येवर आहे. अशावेळी महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा तत्वांशिवाय जग वाचू शकणार नाही. प्रमुख वक्ते प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार सर हे म्हणाले की, सर्वधर्म समभाव ह्या तत्वाचा वापर प्रथम म. गांधी यांनी अंमलात आणला. रघुपती राघव राजाराम या प्रार्थनेत “अल्ला ” या शब्दाचा वापर प्रथम त्यांनीच केला. सत्यत बोलण्यास गांधी हे कधीही घाबरत नसत. तसेच लाल लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जय जवान जय किसान या घोषणेमुळे आज आपण सर्वजण जिवंत आहोत. सीमेवर जवान आपले रक्षण करतात. तर शेतकरी यांनी पिकवलेल्या अन्नावर आपण जिवंत आहोत. आभार संचालक श्री जोगदनकर मारूती यांनी मानले. सूत्रसंचालन ग्रंथपाल यांनी केले. यावेळी वाचनालयाचे सचिव ,श्री गोपीकृष्ण वड्डेपल्ली ,संचालक श्री साखरे मल्लिकार्जून , कर्णिक नगर ‘ ब ‘चे सचिव श्री केने छत्रपती , ज्येष्ठ नागरिक संघटनेचे श्री माने ए.बी. , श्री पाटील एस आर , आणि इतर
वाचक उपस्थित होते.
