वटवृक्ष मंदिर समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य – सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२२/०६/२०२५)
स्वामी समर्थांचे मूळ स्थान असलेल्या व स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या अक्कलकोट नगरीतील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द मराठी सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांनी केले.
ते स्वामींच्या दर्शनाकरिता वटवृक्ष मंदिरात आले असता मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी
सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड बोलत होत्या. पुढे बोलताना वाड यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे राज्यातील एक जागृत तीर्थक्षेत्र असल्यामुळे आज अनेक भाविकांना स्वामींची जागृततेची प्रचिती येत असून त्यामुळेच समर्थांच्या भक्तगणांच्या संख्येत वाढ होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीनेही येणारया भाविकांकरीता करण्यात आलेल्या सोईसुविधांबाबत व मंदिर समितीच्या वतीने वर्षभरातुन राबविले जाणारे विविध धार्मिक कार्यक्रमांबाबत जाणून घेऊन समितीचे धार्मिक क्षेत्रातील योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, दर्शन घाटगे,
प्रा.शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, अमर पाटील, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, चंद्रकांत गवंडी, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ – सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!