Akkalkot swami Samarth: ११००० लक्षवेधी दिपोत्सवाने उजळले भक्त निवास.

अक्कलकोट (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. लगभग ११००० दिव्यांच्या दिपोत्सवात उजळलेले भक्त निवासाचे नयन मनोहरी दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे व लक्षवेधी ठरले.

या दिपोत्सवाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी द्वापार युगापासूनच हिंदू धर्मात दिपोत्सवास मानाचे स्थान आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देव दिपावली. मानवी जीवनातील अंधकार दूर होवून जीवनात नवचैतन्य निर्माण होण्याकरीता हा दिपोत्सव पुर्वापार परंपरेनुसार साजरा होत आला आहे. दिपावली व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आजही राज्यभरातील अनेक भाविक येथे एकत्र येवून जीवनातील अंधकारमय विचारसारणीवर मात करून जीवनात नवचैतन्य प्राप्त करण्याकरीता या दिपोत्सवाच्या माध्यमातून स्वामींचे आशिर्वाद घेवून खऱ्या अर्थाने जीवन सुख समृध्द करून घेतात असे भावोद्गार व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विजयकुमार कडगंची,

राजेश गोवर्धन, संजय पाठक, महादेव तेली, चंद्रकांत गवंडी, शिवशरण अचलेर, रवि मलवे, गिरीश पवार, मल्लीनाथ बोधले, रमेश घोसले आदींसह पायी चालत आलेले अनेक भाविक भक्त उपस्थित होते.
