गावगाथा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणवादी दृष्टिकोन स्वीकारावा : प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण

कल्याणशेट्टी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर

छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यावरणवादी दृष्टिकोन स्वीकारावा : प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण

कल्याणशेट्टी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम

अक्कलकोट

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात वृक्षारोपण करण्याचा आदेश दिला होता. वृक्षाचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून अधिकाऱ्यांना आदेश देखील दिले होते. पर्यावरण संतुलन अबाधित राहावे म्हणून त्यांनी किल्ल्यावर वृक्ष लागवड केली. त्यांचा हा दृष्टिकोन सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते. यावेळी डॉ आप्पासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले छ. शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात वृक्ष संवर्धन करून पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आता मात्र नैसर्गिक स्थिती विचित्र झाली असून निसर्गातील ओझोन वायूचे प्रमाण घटत चालले आहे. त्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचत आहे. अशावेळी वृक्षाची लागवड करणे आवश्यक आहे.

मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, निसर्गातील पाने, फुले झाडांमुळे जीवन आनंदी होते हिरवा निसर्ग पाहिल्यानंतर मनातील अंतःकरणाचा ओलावा सुकावून सोडतो म्हणून पर्यावरण रक्षणासाठी झाडे जगवली पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले, आभार कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी मानले

चौकटीतील मजकूर

विद्यापीठाचा वृक्ष
लागवडीचा संदेश अभिमानास्पद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांनी सुमारे दहा हजार वृक्षांची लागवड केले आहे. वृक्ष जतन व संवर्धनाचा संदेश विद्यापीठाकडून शिक्षक विद्यार्थी व महाविद्यालयांना दिल्यामुळे शेतशिवारातून विद्यार्थी झाडे लावत आहेत तर महाविद्यालयातून देखील वृक्षाची लागवड केली जात आहे. हा स्तुत्य उपक्रम अभिमानास्पद आहे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करताना प्रा डॉ चंद्रकांत चव्हाण मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button