गावगाथा

एआयएमतर्फे मनोहर शेट्ये यांना जीवनगौरव पुरस्कार

पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत देशातील उद्योजकांचा सहभाग

एआयएमतर्फे मनोहर शेट्ये यांना जीवनगौरव पुरस्कार

पुण्यातील राष्ट्रीय परिषदेत देशातील उद्योजकांचा सहभाग

पुणे : जैव उत्तेजक उत्पादकांच्या म्हणजेच अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स (एआयएम) संघटनेच्या वतीने पुण्यात आयोजित उत्पादकांसाठीच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राच्या जैव उत्तेजक उत्पादनातील आघाडीचे उद्योजक मनोहर शेट्ये यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जैव उत्तेजक उत्पादनातील त्यांच्या अतलनीय कार्यासाठी हा गौरव करण्यात आला.
पुण्यातील हॉटेल वेस्ट इनमध्ये या दोन दवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय जैव उत्तेजक उत्पादक समितीचे सल्लागार डॉ. ए. के. सक्सेना यांच्याहस्ते करण्यात आले. या वेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्राजिव चक्रवर्ती, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर, एआयएमचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, ‘एनआरसी’चे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, सचिव समीर पाथरे आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने बायोस्टिम्युलंट है कायद्याच्या कक्षेत आणले आहे. हे जैविक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन धोरण विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जैव उत्तेजकांचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या काळात जैव उत्तेजक उत्पादकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यावर केंद्र शासनाकडून भर दिला जात असल्याची माहिती सक्सेना यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्राजिब चक्रवर्ती म्हणाले, की देशात अनेक जैव उत्तेजक उत्पादकांचे अॅण्ड मार्केटमध्ये येत आहे. परंतु काही उत्पादनांमध्ये कीड नाशकाचे अवशेष आढळल्याच्या समस्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे याला कायद्यानुसार कीडनाशक व जैविक खताशिवाय वेगळे स्थान देण्यात आले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर म्हणाले, की शाश्वत आणि दर्जेदार उत्पादनासाठी राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य आणि संतुलित पीक पोषण यावर भर देणे गरजेचे आहे. आजच्या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत तसेच जैविक ताण आणि दर्जेदार उत्पादन यासाठी संतुलित पोषण हा महत्त्वाचा पर्याय दिसून येत आहे. याकरिता मातो हेच मुख्य माध्यम असून शेती व्यवसायाचे भांडवल आहे. मातीला सशक्त आणि समृद्ध करणे काळाची गरज आहे.
डॉ. कौशिक बॅनर्जी म्हणाले, की, काही जैव उत्तेजकांचे महत्त्व सर्वच पिकांमध्ये आवश्यक आहे. त्यामुळे द्राक्ष संशोधन केंद्रामध्ये त्याचे पृथक्करण केले जात आहे. प्रास्ताविक सचिव समीर पाथरे यांनी केले. तर ‘एम’चे उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे यांनी आभार मानले.
फोटो ओळ
अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स (एआयएम) संघटनेच्या वतीने आयोजित उत्पादकांसाठीच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राच्या मनोहर शेट्ये यांचा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांच्याहस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव समीर पाठारे, वैभव काशिकर, प्रदीप कोठावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button