गावगाथा

हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिरातील मराठी भाषेतील शिलालेखाने इतिहास घडविला.. डॉ अरुणचंद्र पाठक

मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित कार्यक्रम..

हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिरातील मराठी भाषेतील शिलालेखाने इतिहास घडविला..

HTML img Tag Simply Easy Learning    

डॉ अरुणचंद्र पाठक

HTML img Tag Simply Easy Learning    

मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित कार्यक्रम..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिरातील तुळईवर मराठी भाषेत कोरलेला शिलालेखाचा मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी उपयोग झाला, त्यामुळे खऱ्या अर्थाने इतिहास घडला. या शिलालेखा मुळेच मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असे प्रतिपादन केंद्रीय अभिजात भाषा दर्जा समितीचे सदस्य पुरातत्त्व संशोधक डॉ अरुणचंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयतील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते, व्यासपीठावर संचालक मल्लिनाथ मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुलकर्णी, विशाल फुटाणे उपस्थित होते.

पुढे ते म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी असलेल्या अटीमध्ये भाषा अडीच हजार वर्षांपूर्वीची असावी अशी अट होती. त्यावेळी फार मोठी समस्या निर्माण झाली, अशा वेळी सातवाहन राजा हाल याने लिहिलेला गाथा सप्तशती चा आधार घेण्यात आला, परंतु त्याहीपेक्षा ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय आनंद कुंभार यांनी शोधून काढलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथील हेमाडपंती संगमेश्वर मंदिरातील मराठी भाषेतील अडीच हजार वर्षांपूर्वीचा शिलालेख उपयोगी पडला, असे मोठे विधान करत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली. असे गौरवोद्गार काढले. त्यावेळी सोलापूर जिल्ह्याची महानता सर्वांना समजली असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

मल्लिनाथ कल्याणशेट्टी म्हणाले की, मराठीचा अभिमान राज्यातील नागरिकांना आहे, मराठी भाषा ही अभिजात भाषा व्हावी यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. परंतु संगमेश्वर मंदिरातील तुळई वरील मराठी भाषेतील शिलालेखांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे मंदिर मूर्ती शिल्प शिलालेख ताम्रपट नाणी यांचे जतन, संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. या कार्यक्रमास प्रा राजशेखर पवार, प्रा भीम सोनकांबळे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले आभार इतिहास विभाग प्रमुख प्रा मधुबाला लोणारी यांनी मानले.

चौकटीतील मजकूर

हत्तरसंग कुडल येथे साहित्य संमेलन तसेच इतिहास परिषदा व्हाव्यात..

संगमेश्वर मंदिरातील मराठी भाषेतील पहिल्या शिलालेखाचा आम्हास अभिमान आहे, स्वर्गीय आनंद कुंभार यांनी तो मंदिरातील तुळई वरील शिलालेख शोधून काढला, त्यामुळेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्या ठिकाणी मराठी साहित्यिकांचे संमेलन, इतिहास परिषदा होणे गरजेचे आहे असे मत मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात पुरातत्त्व संशोधक डॉ अरुणचंद्र पाठक सपत्नीक यांचा सत्कार मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी उपस्थित मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button