गावगाथा

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

पालखी सोहळा

स्वामी समर्थांच्या जयघोषात वालचंदनगरीत पालखी सोहळ्याचे आगमन

HTML img Tag Simply Easy Learning    

वालचंदनगर : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे श्री
स्वामी समर्थांच्या जयघोषात पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्याचे आगमन झाले. भाविकांनी स्वामींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले . दारोदारी सडा रांगोळी काढून हातात आरती निरंजनी घेऊन पालखीचे स्वागत करण्यात आले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मेन काॅलनी, नवीन बाजारपेठेतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ललिताबाई मंगल कार्यालयात पालखी मुक्कामाला थांबली होती.वालचंदनगरात दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्या चे आगमन झाले.हे पालखी सोहळ्याचे २६ वे वर्षे असून संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावच्या स्वामी भक्ताना समर्थांचे दर्शन घेता यावे म्हणून परीक्रमा चालू केली आहे.वालचंदनगरीत पादुकांचे आगमन झाल्याने परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महिला लहान मुलासह ज्येष्ठांनी या सोहळ्यात सहभाग घेतल्याने याला यात्रेचे स्वरूप आले होते. तर संपूर्ण परिसर स्वामी समर्थांच्या जयघोषात दुमदुमला होता. रात्री ०८:०० वाजता क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली
यावेळी बोलताना दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की’ स्वामी समर्थांच्या चरणी ज्या भक्तांची निष्ठा आहे, त्यांना कोणत्याही अडचणी येऊ शकत नाही .कारण साक्षात स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असतो.
कारण स्वामी समर्थ म्हणतात “”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.. त्यामुळे स्वामी भक्तांनी जीवनाची वाटचाल करताना परोपकार वृत्ती ठेवावी व लोकांना मदत करण्याच्या भावनेने प्रेरित व्हावे म्हणजेच “जनसेवा हीच खरी ईश्वर ठेवा ठरते असे भरणे यांनी सांगितले” श्री स्वामी समर्थ अक्कलकोट प्रणित, स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगर यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट )चे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांचा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले याच्या हस्ते,
प्रदीपसिंग राजपूत सी.बी.आय संचालक, विशेष सहकारी वकील महाराष्ट्र राज्य, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिराजदार, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक उपाध्यक्ष अभय खोबरे, पालखी प्रमुख संतोष भोसले, इंदापूर देशपांडे व्हेज चे मालक उदय देशपांडे, सचिन खुडे बी.डी.ओ इंदापूर, सायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर राजकुमार डुणगे, प्रताप आबा पाटील माजी जिल्हा परिषद, वैशाली पाटील, वीरसिंग रणसिंग इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान सचिव, सौदप्पा इंगळे स्वामी नाम प्रसारक अक्कलकोट, हनुमंत काळे स्वामीभक्त , कळंबचे सरपंच विद्या अतुल सावंत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट :- ज्यावेळी सर्वसामान्य जनता अडचणीत आणि संकट असते त्यावेळी ती फक्त दोनच ठिकाणी धावा करते ती म्हणजे एक असतो परमेश्वर आणि दुसरा असतो पोलीस त्यामुळे पोलिसांना जनतेला सुखाची झोप देण्यासाठी रात्रंदिवस पहारा ठेवावा लागतो पोलिसांच्या आयुष्यात कायम गुन्हेगारी छळ पिळवणूक चोरी भांडण तंटे अशा अनेक बाबी लोकांच्या मार्गी लावताना पोलीस कायम तणावात असतो मात्र अशा भक्तीमय वातावरणात आलं की खाकी वर्दीतील पोलिसांना देखील सुख समाधान आणि शांतता लावत असते असे मत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी व्यक्त केले यावेळी वालचंद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे अकलूज पोलीस स्टेशनचे विक्रम सिंह साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नाव अखिल भारतात धार्मिक व सामाजिक कार्यामुळे झालेला आहे. श्री क्षेत्र अक्कलकोट च्या विकासाचे न्याय हे प्रतिबिंब आहे. सामाजिक बांधिलकीचा आदर्श असल्याचे सांगून दत्तात्रय भरणे यांनी पालखी परीक्रमेस शुभेच्छा व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी गणेश बिराजदार,सचिन खुडे , प्राध्यापक प्रकाश सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी जेष्ठ श्री स्वामी समर्थ मंडळ वालचंदनगरचे , राम कुंभार,राजू भाटिया, जितू दुर्गकर, सचिव अमोल राजपूत, खजिनदार संतोष कदम, विजय कांबळे, संतोष दहिदुले, अविनाश घाटे, बाळासाहेब कवळे, अमोल बोंद्रे, प्रकाश साळुंखे, आंतोष कांबळे,गणेश लंबाते, दादा पठाण, उमेश सगरे, नंदकुमार गोंडगे, वालचंदनगर कंपनीचे अधिकारी व कामगार वालचंदनगर बाजारपेठ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजीत रणवरे यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button