महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे..प्राचार्य डॉ वसंतराव पाटील
कल्याणशेट्टी महाविद्यालया तील राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे..प्राचार्य डॉ वसंतराव पाटील
कल्याणशेट्टी महाविद्यालया तील राज्यशास्त्र विभागाचा उपक्रम

अक्कलकोट

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांची अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन न्यू कॉलेज कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ वसंतराव पाटील यांनी व्यक्त केले.

महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, संपदा पाटील उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, बहुसंख्य विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते म्हणून त्यांच्यासाठी महाविद्यालयाने विविध कोर्सेस सुरू केले पाहिजेत. विद्यार्थ्यांसाठी कन्स्ट्रक्शन, प्लंबिंग, सेंटरिंग, इलेक्ट्रिकल व कृषी तंत्रज्ञान तर मुलींसाठी ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन व बेकरी प्रॉडक्ट इत्यादी कोर्सेस सुरू करून त्यांना सक्षम केले पाहिजे त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन देशाचे दरडोई उत्पन्न वाढणार आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी प्रयत्न केले पाहिजेत.

मलकप्पा भरमशेट्टी म्हणाले, विद्यार्थ्यांनी देखील नाविन्याचा ध्यास घेतला पाहिजे, अभ्यासक्रमाशिवाय नवीन अंगभूत कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, त्यांच्यासाठी महाविद्यालय सदैव सहकार्याची भूमिका घेईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन डॉ शीतल झिंगाडे-भस्मे यांनी केले आभार प्रा राजशेखर पवार यांनी मानले.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या वतीने न्यू कॉलेज कोल्हापूर येथील प्राचार्य डॉ वसंतराव पाटील यांचा सत्कार मलकप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.