संत शिरोमणी रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त वागदरी येथे अभिवादन.
संत रोहिदास महाराज पुण्यतिथी विशेष

संत शिरोमणी रोहिदास महाराज पुण्यतिथी निमित्त वागदरी येथे अभिवादन….

वागदरी — अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.संत कक्कय्या समाज मंदिरात झालेल्या कार्यक्रमात वागदरीचे सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच रविकिरण वरनाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संत रोहिदास महाराजां बदल सविस्तर माहिती सुधीर सोनकवडे यांनी दिले.यावेळी नरसिंग मोहरकर,निलप्पा नंदे,महादेव नंदे,विकास नंजुडे ,सुरेश माने,धर्मा माने,बाळासाहेब कुंभार,मुतप्पा मंगाणे व स्वामी सह मान्यवर उपस्थित होते.
समाजातील जाती-पाती,गरीब -श्रीमंती सारखे भेदभाव दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.या महान संतास उत्तर भारतात संत रविदास तर आपल्या महाराष्ट्रात त्यांना संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. सोळा प्रकारच्या विविध नावांनी ओळखले जाणारे एकमेव संत म्हणून संत रोहिदासांना ओळखले जाते.शिखांच्या गुरूग्रंथसाहेब या पवित्रग्रंथात संत रोहिदासांचे एकूण ४० पदे आहेत.तसेच संत रोहिदास यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ‘द् अनटचेबल’ नावाचा ग्रंथ संत रोहिदासांचरणी अर्पण केला होता. देशात एकजूटीसाठी प्रयत्न करणारे संत म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

हिलमिल चलो जगतमे,फूट पडो दो नही ।
फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई।।

देशात आपापसात, समाजा समाजांत, धर्मा-धर्मांत तेढ निर्माण होऊ देऊ नका. मतभेदांमुळेच समाजाची व देशाची हानी होते असा संदेश त्यांनी दिला.मानवतावादी संत रोहिदासांचे विचार अनेक समकालीन संतांनी प्रत्येक समाजातील घटकापर्यंत पोहचविले.अशा महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.
