
अन्नछत्राचे कार्य म्हणजे स्वामींची आज्ञाच – आयुक्त राजेश नार्वेकर
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले कार्य विस्मयकारक व आनंददायी असून, हे कार्य म्हणजे साक्षात स्वामींचीच आज्ञा असल्याचे गौरवोद्गार राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी काढले.
राजेश नार्वेकर हे सहपरिवार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास भेट देण्यासाठी आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर हेही उपस्थित होते.
या प्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, विश्वंभर पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, एस. के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व बहुसंख्य भक्तगण उपस्थित होते.



