स्वामींच्या भक्तीत लीन होणारे भक्त संकटातून नेहमीच तारतात – न्यायमुर्ती गडकरी
वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनानंतर न्यायमुर्ती गडकरींचे भावोद्गार

स्वामींच्या भक्तीत लीन होणारे भक्त संकटातून नेहमीच तारतात – न्यायमुर्ती गडकरी

वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनानंतर न्यायमुर्ती गडकरींचे भावोद्गार

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे’ हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तारतात असे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एस.गडकरी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळेंच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सचिव आत्माराम घाटगे यांनी न्यायमूर्ती गडकरींचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी न्यायमूर्ती गडकरी यांनी वरील
भावोद्गार काढले. पुढे बोलताना न्यायमूर्ती गडकरींनी जीवनात कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. जीवनाचे सार समजून देणारे स्वामी समर्थांचे अवतार कार्य त्यांच्या जीवन कार्याचे अनुकरण स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात. असेही मनोगत न्यायमूर्ती गडकरी यांनी व्यक्त केले. मंदिर समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन व मंदिरातील सुशोभीकरण परिसर सुशोभीकरण पाहून आनंद व्यक्त केला. याप्रसंगी त्यांच्या समवेत पोलीस उपअधीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, स्वप्नील मोरे, अमित खिस्ती, धनराज शिंदे, धनु राठोड, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, संजय पवार, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – न्यायमूर्ती गडकरी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार केल्यानंतरचे प्रसंग छायाचित्रात दिसत आहे.
