गावगाथा

विदयार्थ्यानी व्यासंगाची आराधना करावी- मुकुंद पत्की

कल्याणशेट्टी महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी पुरस्कार प्राप्त विदयार्थी व मान्यवर

विदयार्थ्यानी व्यासंगाची आराधना करावी- मुकुंद पत्की

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट- विद्यार्थ्यांनी वाचन चिंतन आणि मनन करत जीवन फुलविले पाहिजे, व्यासंगाची आराधना करत स्वतःच्या व्यक्तिमत्वास आकार दिला पाहिजे, तरच देशाचे भवि्तव्य उज्वल होईल असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक मुकुंद पत्की यांनी व्यक्त केले.
महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी हे होते. व्यासपीठावर संचालिका शांभवी कल्याणशेट्टी,
कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख पूनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, सेमी विभाग प्रमुख निखील भालेराव आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढे ते म्हणाले की, अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडे कल्पकता असली पाहिजे, त्यामुळे नवनवीन प्रयोग करण्याची संधी मिळते.

HTML img Tag Simply Easy Learning    

मल्लिनाथ कल्याणशेट्टी यानी म्हणाले की- ध्येय साध्य करण्याच्या हेतूने प्रयत्न केले तर यश हमखास मिळतो. त्यासाठी एकाग्रता असणे आवश्यक आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रारंभी संस्थेचे संस्थापक पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी वंदन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा व सांस्कृतिक विभागात प्रावीण्य संपादन केलेल्या विदयार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. स्वागत प्राचार्य मलकप्पा भरमशेट्टी यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. गुरुशांत हपाळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. भीम सोनकांबळे, प्रा. शीतल झिंगाडे, प्रा. मनीषा शिंदे, प्रा. रंजना चव्हाण, प्रा. शीतल फुटाणे,प्रा. तुकाराम सुरवसे प्रा. विद्याश्री वाले प्रा. विद्या बिराजदार यांनी प्रयत्न केले.

चौकटीतील मजकूर
मुलींनी गुणवत्ता सिद्ध करावी

सीमावर्ती भागातील मुलींची सामाजिक वाटचाल बिकट असते तरी देखील कौटुंबिक स्थितीवर मात करून त्यांनी शिक्षण घेतले पाहिजे, त्यातूनच त्यांची गुणवत्ता सिद्ध होईल असा विश्वास आपल्या भाषणातून शांभवी कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला.

फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी पुरस्कार प्राप्त विदयार्थी व मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button