भाविकांच्या सोयी सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे प्राधान्य – आमदार बाबूराव कदम
(अ.कोट, दिनांक – १३/०६/२०२५)
येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीने व समर्पित कार्याने चालते, म्हणून भाविकांच्या सोई सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे नेहमीच प्राधान्य असल्याचे मनोगत नांदेड जिल्ह्यातील हदगांव-हिमायतनगर मतदार संघाचे विद्यमान आमदार बाबूराव कदम यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आ. बाबूराव कदम व त्यांच्या समवेत असलेले सोलापूर लोकमत वृत्तपत्राचे संपादक मिलींद कुलकर्णी, रमेश तावडे, नांदेडचे युवा सेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील, शहरप्रमुख बबन माळवदे, अरविंद जाधव यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ.बाबूराव कदम बोलत होते. पुढे बोलताना आ.बाबूराव कदम यांनी स्वामी समर्थांच्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेस तत्पर आहे. गर्दीचे स्वरूप पाहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मर्यादित परिसरातही वारंवार विविध प्रकारचे नियोजन असतात, त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे नियोजनबद्ध स्वामी दर्शन हे सुलभतेने पार पडत आहे. अशी ही धन्य सेवा पाहून स्वामी सेवेप्रती असलेल्या मंदिर समितीच्या कार्याचं आपल्याला अभिमान असल्याचे मनोगतही
आ.बाबूराव कदम यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी,
श्रीशैल गवंडी, अमर पाटील, विपूल जाधव, संतोष जमगे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – आ.बाबूराव कदम, मिलींद कुलकर्णी यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!