गावगाथा
आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड!
"राष्ट्रीय पक्ष आम आदमी पार्टीची" जिल्हा कार्यकारणी जाहीर....*

आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड!
HTML img Tag

“राष्ट्रीय पक्ष आम आदमी पार्टीची” जिल्हा कार्यकारणी जाहीर….*

अहमदनगर प्रतिनिधी:-१९(संतोष शिंदे)
“जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.राजेंद्र निळकंठ नागवडे यांची वर्णी”तसेच ्श्रीगोंदा तालुक्यातून जिल्हा कमिटीत ॲड.निलेश शेलार यांची जिल्हा लीगल सेल च्या अध्यक्ष पदी तर सुयोग धास यांची पर्यावरण आघाडी च्या अध्यक्ष पदी सुशील कुमार शेळके सोशल मीडिया प्रमुख पदी व बंडू भुजबळ यांची जिल्हा सदस्य पदी निवड झाल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी दिली. ही निवड महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजू आघाव यांनी केली असल्याचे प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. २६ नोव्हेंबर २०१२ रोजी पक्षाची स्थापना झाली आणि पुढील ११ वर्षात पक्षाने राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवली अशी नोंद झालेला देशातील पहिला पक्ष आहे. दिल्ली मॉडेल ने देशाला प्रगतीची एक नवीन दिशा दिली आहे. पक्षाचे दोन राज्यात सरकार आहे. पंजाब राज्य देखील दिल्लीच्या धरतीवर काम करत आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील पक्ष बांधणी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्ष विस्तार करत आहे. दिल्ली पंजाब प्रमाणे महाराष्ट्रात देखील मोफत शिक्षण, आरोग्य, पाणी, लाईट, महिला सन्मान आणि शेती उद्योगाला चालना हे सूत्र महाराष्ट्रात शहरात गावागावात घेऊन जाणार आहोत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात येत्या काळात सक्षमपणे सर्व निवडणुका ताकदीने लढवल्या जातील अशा सूचना आप प्रदेशला दिलेल्या आहे. पक्ष स्थापने पासून पक्षाची ध्येय धोरणे आम आदमी पर्यंत पोहचणे हीच आप कार्यकर्त्यांचे काम असते. आणि ते काम प्रामाणिक पणे सातत्याने केल्याने ही जिल्ह्याची जबाबदारी मिळाली असावी असे मत राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केले. पक्षात प्रामाणिक ध्येय वेड्या लोकांनी सहभागी होण्याचे आव्हान मी या निमित्ताने करतो तरुणांनी राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पहावे आणि प्रस्थापितांना सक्षम पर्याय उभा करावा. ही काळाची गरज असल्याचे मत नागवडे यांनी व्यक्त केले आहे. पक्षाने जो विश्वास दाखवला या पदाचा उपयोग हा आम जनतेसाठी शेतकरी बांधवांसाठी आणि असंघटित लोकांसाठी करू असा विश्वास या निमित्ताने पक्षाला आणि जनतेला त्यांनी दिला आहे.
(फोटो , राजेंद्र निळकंठ नागवडे)