अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे तीन तेरा , स्वामी भक्तांना सुविधा देणया कामी सर्वच प्रशासकीय यंत्रणा फोल ठरत असलयाचे चित्र
शहर विकास आजवर रेंगाळण्यास अशा प्रकारचे प्रवृत्ती कारणीभूत ठरत आहेत. याच संमधीत यंत्रणेला काहीच सोयरसुतक राहिलेले नाही. यामुळे स्थानिकासह, स्वामी भक्तामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे तीन तेरा , स्वामी भक्तांना सुविधा देणया कामी सर्वच प्रशासकीय यंत्रणा फोल ठरत असलयाचे चित्र आहे.

अक्कलकोट शहरात दररोज लाखों भक्तांची गर्दी होत आहे. यामुळे शहरास जत्रेचे सवरुप येत आहे. भाविकांना सुविधा देणया कामी सर्वच प्रशासकीय यंत्रणा फोल ठरत असलयाचे चित्र आहे. आशा मध्ये नगरपालिका प्रशासनाने मार्ग काढणे ऐवजी आरक्षित जागा रद्द करण्याचा विक्रम करित आहे. परिणामी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे तीन तेरा होत आहे. सर्वसामान्यातून बोलले जात आहे.

भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सन २००० च्या दरम्यान शासनाने काही ठिकाणी जागा आरक्षित केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी २०१२ मध्ये झाली आहे. शहरातील एकूण जागांपैकी समाधी मठाजवळील एक जागा असून, त्याठिकाणी आलेल्या भविकाच्या वाहनांसाठी सिटी सर्व्हे नंबरचे पार्किंग जागा आरक्षित आहे. त्याला जाणे येणे साठी मठा समोरून एक मार्ग जाते. सदर मार्ग ६ मीटर रुंदीचा आहे. नियोजित पार्किंग तळ सुरू झाले तर मठा जवळील भाविकांना मोठी सोय होणार आहे. ती आरक्षण कायम ठेवून ते करण्यापूर्वीच रद्द करण्यासाठी प्रस्थाव काही स्वार्थी मंडळी नगरपालिका कार्यालयात दाखल केले आहेत. याला प्रतिसाद देत नगरपालिका यांनी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धीकरण देऊन तात्काळ कामाला लागले आहेत.

शहर विकास आजवर रेंगाळण्यास अशा प्रकारचे प्रवृत्ती कारणीभूत ठरत आहेत. याच संमधीत यंत्रणेला काहीच सोयरसुतक राहिलेले नाही. यामुळे स्थानिकासह, स्वामी भक्तामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नियोजन पार्किंगला जाणे येणे साठी असलेले नियोजित ६ मीटरचा रस्ता आरक्षण हटविल्यास नियोजित कामाचे तीन तेरा वाजणार आहे. याठिकाणी काही बोटावर मोजण्या इतके लोकांच्या हितार्थ ही आरक्षण हटविण्याचे काम होत असल्याचे चर्चा होत आहे. सदर आरक्षण हटवू नये म्हणून शेकडो तक्रार दाखल झालेले आहेत.त्यावर अध्याप सुनावणी झालेली नाही. सध्या पदाधिकारी नसताना आशा प्रकारचे घाई का? नगरपरिषदेवर प्रशासक आलयापासून अककलकोट असो मैंदगीँ,दुधनी प्रशासकांनी शहर विकासापेक्षा जागेचया आरक्षणा बाबत चया कामाचा जोर दिसून येत असलयाचे शहरवासियांतून बोलले जात आहे.याबाबत नगरपालिका संचलयनाकडून चौकशी ची मागणी पुढे येत आहे.

याबाबत बोलताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील म्हणाले, सदर रस्त्यामुळे स्वामींचा भांडरखाना बाधित होऊ शकतो, आशा प्रकारचे अर्ज पुजारी लोकांनी दिली आहे. त्यावरून हरकती मागविले आहे. अनेक हरकती दाखल झालेले आहेत. त्याचे सुनावणी झाल्यानंतर त्याचे अहवाल वरिष्ठांकडे पाठवून देण्यात येणार आहे. त्यानंतर निर्णय होणार आहे. इतकी घाईगडबडीने रद्द होणार नाही. शक्यतो हरकती आल्यानंतर सदर अर्ज रद्द करावा लागतो असे पाटील म्हणाले.