बोरामणीत २१ जोडप्याच्या बांधल्या गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’
पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम...

बोरामणीत २१ जोडप्याच्या बांधल्या
गेल्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठी’

पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे मित्र मंडळाचा उपक्रम…

सनई-चौघडयांच्या ‘मंगल’सूरात हजारो व-हाडी मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी येथे गुरूवारी, दुपारी १२ वाजून २३मिनिटांच्या शुभ मुर्हूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत २१ जोडप्यांच्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठया’ बांधण्यात आल्या.यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधू-वरांस शुभाशिर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


बोरामणी येथे दरवर्षी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे सदस्य धनेश आचलारे यांच्यावतीने सर्वधर्मिय सामुदायिक मोफत विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात येते.यंदाचे अकरावे वर्ष होते. सकाळी नऊ पासूनच नव वधू-वरांचे व पाहुणे मंडळीचे बोरामणीत आगमन सुरू होते.यावेळी पाहुण्यांचे स्वागत आचलारे मित्र परिवारातर्फे करण्यात येत होते.यावेळी आलेल्या व-हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रसह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी पोषाखसह हळदीचे कपडे देण्यात आले.यावेळी वधू-वरांचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आले. त्यानंतर काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात
आकर्षक मांडवात विविध धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला.

यावेळी या विवाह सोहळयात भोजन व्यवस्था,अक्षता सोहळा चांगल्या पध्दतीने करण्यात आले होते.हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आचलारे मित्र परिवार व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.आतापर्यंत एकूण २३२ जोडप्यांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या आहेत.
यावेळी माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, अमोल भोसले,
शीतल म्हेत्रे, अधिकारी हरीभाऊ मिंड, दिपक जाधव,दशरथ कसबे,राजन जाधव, नागेश गायकवाड,अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, गौतम चंदनशिवे, बापू वाडेकर, युवराज सरवदे,चन्नवीर मटगे, सरपंच
प्रकाश आवटे, मल्लीनाथ आवटे, आप्पा हलसगे, गौस शेख, संजय पटणे, विठ्ठल साखरे, सतीश बिराजदार,चंद्रकांत पटणे,
, त्र्यंबकेश्वर विभूते, धनेश शेळगे, पोपट पुकाळे,दिलीप होटगे आदी उपस्थित होते.
चौकट
अकरा हजाराची ठेव
या विवाह सोहळयात सहभागी झालेल्या वधू-वरांस पहिली मुलगी झाल्यास त्या मुलींचे नांवे धनेश आचलारे यांच्यावतीने ‘मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कन्यारत्न’ योजनेतंर्गत त्या मुलींच्या नांवे अकरा हजाराची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे.अठरा वर्षानंतर वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे अशी माहिती धनेश आचलारे यांनी दिली..
चौकट
सामाजिक ॠण फेडण्याचे कार्य…
कोरोना,महागाई,दुष्काळी परिस्थिती आणि कौटुंबिक अडचणीमुळे आज विवाह कार्य पार पडणे कठीण जात आहे.नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन धनेश आचलारे यांनी गोर-गरिब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह लावून देत आहेत.खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे.आचलारे यांच्याकडून सामाजिक ॠण फेडण्याचे काम होत आहे,सामाजिक ॠण फेडणा-या धनेश आचलारे यांना जनतेने मोठे करावेत
असे गौरवोद्गार काशी पीठाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
चौकट
आचलारे यांच्या पाठिशी राहू
धनेश आचलारे यांचे सामाजिक व राजकीय कार्य कौतुकास्पद आहे. आपण सदैव आचलारे यांच्या पाठिशी राहू अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोलताना दिली.