
विद्यार्थ्यांना नशा मुक्ती बद्दल शपथ…


मुंबई प्रतिनिधी…गणेश हिरवे, सध्या संपूर्ण राज्यात जागतिक नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात येत असून याच अनुषंगाने कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर विद्यालयातील मुलांना नशा मुक्त दिनाची शपथ देण्यात येऊन, त्याचबरोबर घोषणाही देण्यात आल्या.वाईट गोष्टीचे कोणतेही व्यसन हे वाईटच आणि आपल्या जीवावर उठणारे असते.तेव्हा व्यसन करायचे असेल तर चांगल्या गोष्टींचे करावे.या कार्यक्रमाचे आयोजन ३ महाराष्ट्र बटालियन आर्मी एन सी सी युनिट चे वतीने शाळेतील एन सी सी प्रमुख म्हणून काम पाहणारे विश्वनाथ पांचाळ आणि अमोल जागले या शिक्षकांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होतें. शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे, शिक्षक रत्नकांत विचारे, जयवंत कुलकर्णी घनश्याम जोशी,अर्चना सातपुते, संचिता कणसे, अश्विन. बोरणारे, बाळाराम बांगारे आदी मान्यवरांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविले.यावेळी शाळे भोवतालच्या परिसरात मुलांनी प्रभात फेरी काढत जनजागृती केली.
