गावगाथा

मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरणार.दिव्यांग आक्रोश मोर्चा संदर्भात अक्कलकोट येथे बैठक.

निवेदन

मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरणार.दिव्यांग आक्रोश मोर्चा संदर्भात अक्कलकोट येथे बैठक.

कुरनूर: अक्कलकोट तालुक्यातील प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छ. संभाजीनगर येते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग, निराधार, वयोवृद्ध, विधवा महिला यांच्या प्रमुख मागण्या करीता दिव्यांग आक्रोश मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयांवर काढण्यात येणार आहे. त्यांच्या नियोजना करीता अक्कलकोट पंचायत समिती येथे महत्त्वाची बैठक घेण्यात आली.बच्चू कडू यांच्या आदेशाप्रमाणे अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना भेटून अक्कलकोट शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.दिव्यांगांना कोणाचाही आधार नसतो त्यामुळे शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी प्रशासनाने झोकून देऊन काम केले पाहिजे व तसेच नवीन नवीन योजना त्यांच्यासाठी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे शासन अनेक योजनेवर लाख रुपये खर्च करते परंतु दिव्यांगावर देखील विशेष लक्ष देऊन योजना आणखी राबवले गेले पाहिजे जेणेकरून दिव्यांग बांधव स्वावलंबी झाले पाहिजे. असे दिव्यांग बांधव पत्रकारांशी बोलताना सांगितले.तसेच या बैठकीला विभागीय जिल्हाध्यक्ष विजय पुरी, ता. नितीन माने, ता. उपाध्यक्ष तुकाराम साखरे, कार्याध्यक्ष सिध्दाराम बंडगर,खजिनदार सतीश कोळी, परमेश्वर स्वामी, बिरण्णा माशाळे, बबिता शिंदे, वाहिद पठाण, आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button