सिध्देश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रोड रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी व दर गुरुवारी वंदे भारत एक्सप्रेसचे नियोजन करण्याची मागणी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केली आहे.
मागणी
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230213-WA0060-455x470.jpg)
अक्कलकोट, दि.14 : सिध्देश्वर एक्सप्रेस अक्कलकोट रोड रेल्वे स्थानकापर्यंत सोडण्याची मागणी व दर गुरुवारी वंदे भारत एक्सप्रेसचे नियोजन करण्याची मागणी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी केली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मुंबईहून अक्कलकोटला येणार्या भक्तांसाठी रेल्वे ही सोलापूरपर्यंतच असल्याने स्वामी भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याने मुंबईहून सोलापूरला येण्यासाठी आधीपासून सुरु असलेली सिध्देश्वर एक्सप्रेस ही अक्कलकोटपर्यंत सोडावी. सिध्देश्वर एक्सप्रेसचा शेवटचा थांबा हा अक्कलकोट रोड रेल्वे स्थानक येथे केल्यास स्वामीभक्त हे थेट श्रीक्षेत्र अक्कलकोटपर्यंत अवघ्या काही मिनिटात पोहोचू शकणार आहेत. तसेच रात्री परत निघणारी सिध्देश्वर ही देखील अक्कलकोट स्थानकावरुनच निघावी यामुळे भक्तांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात झाली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सोलापूर व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते साईनगर शिर्डी या मार्गावर एक्सप्रेस धावू लागले आहेत. मात्र मुंबई – सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस दर गुरुवारी धावणार नसल्याने श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येणार्या भक्तांना सदर रेल्वेचा फायदा होणार नसल्याचा चित्र आहे. त्यामुळे गुरुवार देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरु राहण्याची अमोलराजे भोसले यांनी केली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)