३६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या छोट्या वृक्षांचे (अन्नदानाचे कार्य) आज वटवृक्षमध्ये रूपांतरण झाल्याचे पाहून मनस्वी आनंद होत आहे : अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ३६ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या छोट्या वृक्षांचे (अन्नदानाचे कार्य) आज वटवृक्षमध्ये रूपांतरण झाल्याचे पाहून मनस्वी आनंद होत असल्याचे मनोगत अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत तहसीलदार बाळासाहेब सिरसट व मैंदर्गीचे काशिनाथ दिवटे, नागप्पा दुर्गे हे उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, दत्ता माने, सौरभ मोरे, पिंटू दोडमनी, गोटू माने, प्रवीण घाटगे, निखिल पाटील, राजू पवार, प्रसाद हुल्ले, धनंजय निंबाळकर, समर्थ घाटगे, शरद भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
