गरीब विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती साठी २० लक्ष तरतुद – सिईओ दिलीप स्वामी*
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी

गरीब विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती साठी २० लक्ष तरतुद – सिईओ दिलीप स्वामी*

सोलापूर – विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढी साठी लक्ष द्या. गरीब विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या फी साठी जिल्हा परिषद सेस मधून २० लक्ष तरतुद करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये शिक्षण विभागाची वतीने बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण तसेच विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. या साठी जिल्हा परिषद सेस मध्ये गरीब मुलांची फी भरणे साठी जिल्हा परिषद सेस मध्ये २० लक्ष रूपयांची तरतुद करणेत आली आहे. या मुळे विद्यार्थी चांगले गुणवत्तेने यश मिळवतील अशी आशा व्यक्त करतो.
शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षात खुप चांगले काम केले. काही प्रकारामुळे विभागाची प्रतिमा मलिन झाली. या साठी सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छ सुंदर शाळा व सायकल बॅंके साठी चांगले काम केले आहे. शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी विभागातील अनेक कामांना चांगल्या प्रकारे गती देणेचे काम केले आहे. सर्व टीम चांगले काम करीत आहे.

*सर्व खेळाडूंना या वर्षा पासून भोजन व्यवस्था – …………*
सिईओ दिलीप स्वामी म्हणाले शालेय क्रिडा स्पर्धे साठी सहभागी शिक्षण व विद्यार्थी यांचे साठी भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करणेत आली आहे. शिष्यवृत्ती साठी ची तरतुद व खेळाडूंना प्रथमच अशी सुविघा देणेत येत आहे.
शिक्षणाधिकारी संजय जावी चर म्हणाले सिईओ यांनी जिल्हा स्तरावर पथक निर्माण करून तपासणी करणेचा निर्णय घेतले नंतर आठ दिवसात सोलापूर जिल्हा राज्यात टाॅप ५ मध्ये गेला आहे. आधार नोंदणी चे काम ९७ टक्के झाले असून दक्षिण सोलापूर व मोहोळ व माढा ने चांगली कामगिरी केली असल्याचे सांगितले.
