दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी अशोकराव मुलगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवड...

अक्कलकोट, दहिटणे येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी अशोकराव मुलगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
अशोकराव मुलगे हे कारखान्याचे पूर्वाश्रमीचे लेखापाल व खरेदी विभागाचे अधिकारी असून कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामापासून कार्यरत आहेत. गेल्या आठ वर्षात साखर कारखाना बंद जरी असला तरी त्यांनी सदर अधिकारी पदाची जबाबदारी पार पाडली आहे. बी.कॉ.शिक्षण पूर्ण झालेले अशोकराव मुलगे हे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील गोगाव येथील असून त्यांचे शालेय शिक्षण वागदरी शेळके प्रशाला तर महाविद्यालयीन शिक्षण खेडगी व दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे झालेले आहे.
अशोकराव मुलगे हे गेल्या 23 वर्षापासून स्वामी समर्थ कारखान्यात प्रशासन विभाग ते यंत्र सामुग्रीच्या विविध विभागाची जबाबदारी नेटाने पार पाडली असून साखर कारखान्याच्या बाबत प्रदीर्घ अनुभव असल्याने माजी आमदार तथा अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी व संचालक मंडळाने त्यांच्यावर कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साखर कारखान्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.
या निवडीबद्दल बोलताना अशोकराव मुलगे म्हणाले, माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील व संपूर्ण संचालक मंडळाने जी जबाबदारी दिली आहे. ती नेटाने पार पाडू, शेतकरी, सभासद, कारखाना, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांची सांगड घालून श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने साखर कारखाना पुनश्च 1999 चा विक्रम मोडेल, त्यापध्दतीने काम करु अशी ग्वाही मुले यांनी दिली. स्वामी समर्थ कारखाना हा आठ वर्षापासून बंद होता. तो आता गळीतास पुन्हा सज्ज होतोय असे यावेळी मुलगे म्हणाले. अशोकराव मुलगे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
