श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्य सातासमुद्रापार झालेले असून, आम्हा कोल्हापूरकरांचे न्यास हे धार्मिक केंद्र बिंदू असल्याचे मनोगत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील*

पाटील परिवार यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री कार्य सातासमुद्रापार झालेले असून, आम्हा कोल्हापूरकरांचे न्यास हे धार्मिक केंद्र बिंदू असल्याचे मनोगत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत डॉ. डी.वाय.पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू संजय पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, वैजयंतीताई पाटील, पुजाताई ऋतुराज पाटील, वृषालिताई पृथ्वीराज पाटील यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संतोष पाटील, संजय पाठोळे, रोहित पाटील, अभिजित नवले, सुभाष पाटील व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रवीण घाडगे, अभियंता किरण पाटील, ऋषी लोणारी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button