गावगाथा

*ऐन पावसाळ्यात अक्कलकोटवासीयांना पाणी टंचाईचे संकट*

मत दे रिपाईला, पाणी येईल नळाला....

*ऐन पावसाळ्यात अक्कलकोटवासीयांना पाणी टंचाईचे संकट*
अक्कलकोट (प्रतिनिधी) :- राज्यामध्ये सध्या मान्सून मोठ्या प्रमाणात बरसत असून काही जिल्हा तसेच तालुक्यामध्ये पुरस्थीती निर्माण झाली असून सोलापूर जिल्ह्य़ातील अक्कलकोट तालुका व शहरामध्ये म्हणावे तितके पाऊस न पडल्यामुळे नागरीकांना भिडणाऱ्या मुलभूत तिन गरजापैंकी एक महत्वाचे म्हणजे पाणी हे जिवनाचे अंतीम सत्य आहे. पण सध्या ऐन पावसाळ्यात अक्कलकोटवासीयांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तरी अक्कलकोट नगरपरिषदेकडून त्यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याची दिसुन येत नसल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अक्कलकोट शहरातील वेताळ चौक, मोरे वस्ती, माणिक पेठ, भिमनगर या वस्तीमध्ये प्रत्येकी दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधले असून त्यातील भिमनगर येथील पाण्याची टाकीचे टेस्टींग करण्यात आली. त्या आशेने त्यानंतर अनेक लाभार्थी टेस्टींग झाल्यानंतर प्रत्येक कुटुंबीय नगरपालिकेला शासनाच्या नियमानुसार हमीपञ, बॉन्ड पेपर, घरपट्टी, तसेच सारा कर इत्यादी सर्व काही भरुन देखील भिमनगर मधील नागरीकांना नळ कनेक्शन अधीकृत घेतले असताना त्यांना कळाले की सदर पिण्याच्या पाण्याची टाकिचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने गळती होत असल्याचे निदर्शनास असल्याने आजतागायत भिमनगर वासीय पिण्याच्या पाण्याची प्रतिक्षा करीत आहेत. तरी आजतागायत नगररीषेकडून आजपर्यंत पिण्याचे पाणी येथील नागरीकांना मिळाले नाही. नगरपरिषद फक्त वसुली करण्यामध्ये व्यस्त आहे माञ तेथील नागरिकांना सुख सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. तिर्थक्षेञ असलेल्या पवित्र ठिकाणी जर नागरिकांना अशी वागणूक भेटत असेल तर राज्यातील इतर नागरीकांचे विचार न केलेले बरे. स्वामी समर्थ समाधी मंदिर ते स्वामी समर्थ समाधी मठापर्यंत स्वामी भक्तांना कोणत्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची अथवा शौचालयाची व्यवस्था नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली नसल्याने अनेक महिलांनी याबाबत नगरपरिषद प्रशासनाचे निषेध व्यक्त केले आहे. अक्कलकोट शहरात नळपट्टी भरुन देखील वेळेवरती पाणी पुरवठा होत नसल्यामुळे उन्हाळ्यात २०-२२ दिवसाआड पाणीपुरवठा आणी पावसाळ्यात १०-१२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याची सरासरी पकडली असता महिन्याला दहा दिवस पाणी पुरवठा नगरपरिषदेकडून होत असून वार्षिक पाणी पुरवठा काढले असता वर्षातून फक्त १२० दिवस पाणी पुरवठा नगरपरिषदेकडून होत आहे माञ त्याबदल्यात पुर्ण वर्षाचे म्हणजेच ३६५ दिवसाचे पाणी पुरवठा कर सर्व सामान्य नागरीकांकडूंन वसूल करण्यात येत आहे. तसेच दहा दिवसातूनही नळपट्टी तसेच घरपट्टी भरुन देखील काही भागामध्ये पाणी पुरवठा होत नसल्याने खाजगी पाणी टँकर मागवून एका हजार पाणी टँकर मागे ३०० रुपये मोजावे लागत आहे. याठिकाणी नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याची दिसुन येत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या कडे भिमनगर येथील तसेच अक्कलकोट शहरातील अनेक नागरिक या विषयावरची आवाज उठविण्यासाठी विनंती करीत आहेत.जर येत्या आठवडाभरात त्यावरती कोणत्याही प्रकारची उपाययोजना होत नसल्याचे दिसून असल्यास गुरुपौर्णिमा उत्सव झाल्यानंतर अक्कलकोट नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट:- सुन म्हणे सासूला, पाणी नाही नळाला, सासू म्हणे सुनेला, मत दे रिपाईला, पाणी येईल नळाला….

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button