श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय असून, न्यासाच्या कार्यामुळेच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात व लौकिकात भर पडत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे
धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय असून, न्यासाच्या कार्यामुळेच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात व लौकिकात भर पडत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांकरिता अध्यावत असे विविध कामे केलेली आहेत. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय असून, न्यासाच्या कार्यामुळेच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात व लौकिकात भर पडत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली स्वामी भक्तांकरिता अध्यावत असे विविध कामे केलेली आहेत. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक उपक्रम हे उल्लेखनीय असून, न्यासाच्या कार्यामुळेच श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात व लौकिकात भर पडत असल्याचे मनोगत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत अक्कलकोटचे न्यायाधीश बाळासाहेब गायकवाड, सह न्यायाधीश आर.एम.शेख, सह न्यायाधीश महेश पाटील, हे उपस्थित होते.

यावेळी स्वप्नील मोरे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, अशोक कोळी व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, पुरोहित संजय कुलकर्णी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, श्रीनिवास गवंडी, समर्थ घाडगे, दत्ता माने, धनंजय निंबाळकर, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, अनिल बिराजदार, नाथाभाऊ भजनावळे, शावरप्पा माणकोजी, कुमार सलबत्ते, बाळासाहेब घाडगे, तानाजी पाटील, गणेश पाटील, शरदराव भोसले, चंद्रकांत हिबारे, मल्लिनाथ कोगनुर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
