ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार मिळे पर्यत गप्प बसणार नाही — आमदार सचिन कल्याणशेट्टी

अक्कलकोट तालुक्याला तर उजनीचे पाणी मिळणारच आहे.

अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार मिळे पर्यत गप्प बसणार नाही — आमदार सचिन कल्याणशेट्टी

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट,: आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पदभार घेतल्यापासून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गाव, वाड्या, वस्त्या, तांडे यांच्या विकासाकरिता सतत कार्यरत आहेत. या बरोबरच उजनीचे पाणी मतदारसंघाकरिता मिळणेकामी त्यांचे प्रयत्न सुरु आहे.
अक्कलकोट तालुक्याला तर उजनीचे पाणी मिळणारच आहे. या बरोबरच मतदारसंघातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग परिसरातील सुमारे 1 हजार 500 हेक्टर जमिन जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार जून 2023 अखेर ओलिताखाली येणार असून एकरुख उपसा सिंचन योजनेची वेगाने अंमलबजावणी करण्यात येत आहे. उजनीतून 3.18 टीएमसी पाण्याची अक्कलकोट व दक्षिण मधील शेतकरी गेल्या तीन दशकापासून वाट पाहत आहेत. कायम दुष्काळाच्या छायेत राहणार्‍या या दोन्ही तालुकावासियांना उजनी धरणातील पाणी म्हणजे मृगजळ वाटत होते. पण ती आता आवाक्यात आले आहे. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाने पुर्णत्वास येण्यास मदत होत आहे. एकरुख तलावात उजनीचे पाणी सोडले जाणार असून तेथून ते बोरामणी येथे लिफ्ट करुन बोरामणीतून एक कालवा दर्शनाळ मार्गे बोरी नदीला 2 टीएमसी तर दर्गनहळ्ळी मार्गे 1.18 टीमएसी वळसंग परिसरात येणार आहे. दर्गनहळ्ळी, वडगाव, दिंडूर मार्गे कालव्यातून पाणी येणार असून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लिंबी चिंचोळीपासून बंदिस्त नलीका वितरण प्रणालीव्दारे गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करुन लिंबीचिंचोळी 105, वळसंग 398, आचेगाव 281, शिंगडगाव 315, हणमगाव 188, औज 181 अशा जवळपासून 1 हजार 476 हेक्टरला पाणी दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जलसंधारणाच्या कामाला विशेष महत्त्व दिले असून नक्कीच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यकाळातच सदरचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण होईल, अशी जलसंपदा विभागाची कार्यप्रणाली एकरुख उपसा सिंचन योजनेकरिता सुरु असल्याने शक्य वाटत आहे.
वळसंग परिसरातील शेतकर्‍यांना 10 ते 12 लिटर प्रतिसेकंद वेगाने मागणीप्रमाणे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वर्षातून किमान तीन आवर्तने देण्याचा प्रयत्न उपलब्धतेनुसार पाणी दिले जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button