श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान आहेस्वच्छता व नियोजन, पर्यावरण पूर्वक वातावरण ह्या बाबी देखील उल्लेखनीय असल्याचे मनोगत भारताचे अप्पर महा साँलिसीटर जनरल अनिल सिंग
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान आहेस्वच्छता व नियोजन, पर्यावरण पूर्वक वातावरण ह्या बाबी देखील उल्लेखनीय असल्याचे मनोगत भारताचे अप्पर महा साँलिसीटर जनरल अनिल सिंग
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासकडून असंख्य स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जात असून, सामाजिक कार्यात देखील मोठे योगदान आहे. याबरोबरच न्यासाच्या परिसरातील स्वच्छता व नियोजन, पर्यावरण पूर्वक वातावरण ह्या बाबी देखील उल्लेखनीय असल्याचे मनोगत भारताचे अप्पर महा साँलिसीटर जनरल अनिल सिंग (उच्च न्यायालय मुंबई) यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
त्यांच्या समवेत सोलापूरचे प्रमुख सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अँड.मिलिंद थोबडे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पो.कॉ. गजानन चव्हाण हे उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, नामा भोसले, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, शरद भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.